चौफेर न्यूज – 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅम उपप्राचार्या सौ.स्मिता नेरकर मॅम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर,श्री.तुषार देवरे सर,श्री.राहुल अहिरे सर संयोजक श्री.कुणाल देवरे सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
65 किलोची तलवार वागवतो त्याच नाव येसाजी,दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याच नाव बाजी,हात तुटला तरी लढतो त्याच नाव तानाजी,आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला नेतो तो संताजी,शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो तो धनाजी,ढाण्या वाघाला सामोरे जातो व उभा फाडतो त्याच नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो व स्वराज्याचे तोरण बांधतो त्याच नाव छत्रपती शिवाजी अस तडफदार पणे वकृत्व करणाऱ्या इयत्ता नववीतील पल्लवी वाघने कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी इयत्ता पाचवीतील नेहा पाटील हिने शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती देतांना सांगितले की अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात राज्यांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे.या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या अजोड कर्तृत्व आणि महान चारित्र्यातच दडलेली आहे. तसेच शिवरायांच्या जयंती निमित्ताने इयत्ता पाचवी व सहावी तील विद्यार्थ्यांनी पाळणा गीत सादर केले.तसेच इयत्ता नववीतील जयेश देसले याने सर्वांना संबोधित करत सांगितले की नुसते राजमुद्रेचे लॉकेट घालून व माडीवर भगवे झेंडे लावून शिवभक्त होत नाही तर त्यांचे आचार विचार व गुण आत्मसात करून शिवभक्त होऊ शकतो.असे प्रतिपादन केले. इयत्ता नववीतील तनिष्क भामरे लिखित कविता “आजचा मावळा वाटतय काहीतरी चुकतोय” ही कविता त्रिनयन पाटील याने विद्यार्थ्यांसमोर सादर केली.तसेच भूमिका पाटील,राधिका देवरे,जयेश पाटील व लोकेश अहिरराव यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध पैलूंवर आपले मत व्यक्त केले.तसेच सौ.रोहिणी अहिरराव मॅडमांनी अफजलखान व शिवाजी महाराजांच्या भेटीचे प्रत्यक्ष विवरण व विशिष्ट कामासाठी विशिष्ट व्यक्तींची निवड शिवराय कसे करतात या विषयी माहिती दिली व श्री.धर्मराज अहिरे सरांनी शिवरायांचे नियोजन,शिस्तबद्धता,कर्तव्यनिष्ठा,दूरदृष्टी,सर्वधर्मसमभाव या गुणांचे उदाहरणे देऊन असे गुण आपण सर्वांनी आत्मसात करावे याविषयी माहिती दिली.शाळेचे संस्थापक श्री.प्रशांत भीमराव पाटील सर प्राचार्या सौ वैशाली लाडे मॅम यांनी सर्वांना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे संयोजन श्री.कुणाल देवरे सर यांनी केले.सुंदर फलक लेखन श्री.रावसाहेब सावळे सर व श्री.मोहन गावित सर यांनी केले. आकर्षक व सुंदर रांगोळीचे रेखाटन वृषाली सोनवणे मॅम व वैष्णवी थोरात मॅम यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.