चौफेर न्यूज – महाराष्ट्रासह देशभर पुन्हा वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता आता पालकांच्या, शिक्षकांच्या अअणि विद्यार्थ्यांच्या मनातही यंदांच्या बोर्ड परीक्षांना कोरोना सावटाखाली सामोरं कसं जायचं? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान राज्यात शिक्षण मंडळाकडून पर्यायी परीक्षेच्या स्वरूपाची चाचपणी होत असताना आता सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) परीक्षे वेळापत्रकानुसारच होईल असे म्हटलं आहे. यंदा देशभर सीबीएसई बोर्डाची 10वी, 12वीची परीक्षा 4 मे पासून सुरू होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सध्या तरी सीबीएसई बोर्ड त्यांच्या 10वी, 12वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या विचारात नाही.
सध्या देशभरातून काही विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ऑनलाईन पिटिशन साईन करून त्याची मागणी केली आहे. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. Change.org वर करण्यात आलेल्या पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांचं असं मत आहे की, ‘ एकीकडे कोरोना रूग्ण काही हजार असताना परीक्षा रद्द झाल्या होत्या पण आता कोरोना रूग्णसंख्या वाढ ही उच्चांकी असताना परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे. यावर शिक्षण मंत्र्यांनी विचार करावा.
PTI सोबत बोलताना सीबीएसई च्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता परीक्षा केंद्रांवर अधिक खबरदारी घेतली जाणार आहे. 40-50% अधिक परीक्षा केंद्र वाढवली जाणार आहेत. यामुळे सोशल डिस्टंसिंग ठेवता येणार आहे.