चौफेर न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल लागून एक वर्ष पूर्ण झालं तरी अद्यापर्यंत 413 भावी अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. 1 वर्षापासून या भावी अधिकाऱ्यांच्या पोस्टींग थांबल्याने या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं चाक थांबलं आहे. कोणी शेतात काम करत आहेत. तर कोणी लोकांच्या घरी शेतात काम करत आहे. कोणी फळ विकण्याचा धंदा करत आहे. उच्च शिक्षित असून लॉकडाऊनच्या काळात या विद्यार्थ्यांना मिळेल ते काम करावी लागत आहेत.
अनेकांची लग्न थांबलं आहेत. मुलांचं एक वेळेस ठीक आहे. मात्र, मुलींना पोस्टींग न मिळाल्यानं मुलींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी अधिकारी झाल्या असतानाही घरचे आता त्यांच्यावर लग्नासाठी आग्रह धरत आहेत.
मराठा आरक्षणाच्या आड सरकार सरकारने या नियुक्त्या दिलेल्या नाहीत. पण आज मराठा आरक्षणाचा निकाल लागून (5 मे 2021) एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत या भावी अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी पाच ते सहा वर्षे अभ्यास करून अत्यंत हलाखीत दिवस काढले आहेत.
एक पोस्ट मिळवण्यासाठी 5 ते 6 वर्ष अभ्यास करणारे हे विद्यार्थ्यांना एक पोस्ट मिळवण्यासाठी परीक्षा जाहीर झाल्यापासून साधारण 1 ते 1.5 वर्ष लागते. मात्र, या विद्यार्थ्यांचा जाहिरात सुटल्यापासून कालावधीचा विचार केला तर अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत.
या परिक्षेची जाहिरात डिसेंबर 2018 मध्ये सुटली होती. पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2019 मध्ये तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी जुलै 2019 मध्ये या परिक्षेच्या मुलाखती फेब्रुवारी 2020 मध्ये तर अंतिम निकाल 19 जून 2020 ला लागला होता. त्यामुळं येत्या 19 जूनला परीक्षेचा निकाल लागला तरी या भावी अधिकाऱ्यांना नियुक्त्या न दिल्यानं या विद्यार्थ्यांनी आंदोलना चा इशारा दिला आहे.