चौफेर न्यूज – दहावीच्या निकालानंतर आता सगळ्यांचं लक्ष बारावीच्या निकालाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता बारावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
जुलैअखेरपर्यंत निकाल लागणार होता त्यामुळे आज निकाल लागणार असं सगळ्यांना वाटत होतं मात्र आता इयत्ता 12 वी राज्य बोर्ड निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं समजतंय. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार असून अजून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पूर आला असल्यानं तेथील बोर्डाचे प्रशासकीय काम बाकी राहिलं आहे. त्यामुळे बारावीचा निकाल थोडा उशीरा लागणार असल्याचं समजतंय.
दरम्यान, यावर्षी महाराष्ट्र एचएससी परिक्षा 2021 साठी साधारण 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे.