चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून (घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइनच्या साहाय्याने आपला निकाल बघितला. मात्र आता विद्यार्थ्यांना निकालपत्रकाची इच्छुकता लागली आहे. याचप्रमाणे आता पुण्यातील शाळॆत इयत्ता 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशा सूचना देखील शाळांना दिल्या आहेत.
राज्य शासनाकडून शाळांना गुणपत्रिका वितरणाबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळाकडून शाळांना 7 ऑगस्ट तसेच, 9 ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील. नंतर, शाळांनी 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिका द्याव्यात, असं म्हटलं आहे. या दरम्यान, राज्यातील 99. 95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के इतका आहे.
या दरम्यान, कोरोनाकाळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाची सोय व्हावी.
या अनुषंगाने जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित करण्यात आलेत.
म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देणे शक्य होणार आहे.
तर, या ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवडाभरात ते सुरु होईल.
पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली आहे.