चौफेर न्यूज – आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी पवना नदीपात्रातून रोज करोडो लिटर पाणीउपसा केला जातो त्यासाठी रावेत येथे पालिकेने जलउपसा केंद्र उभारले असून त्याठिकाणावरून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते, तरी गेल्या काही महीन्यांपासून या ऊपसाकेंद्राजवळ नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकन्याचे काम अनोळखी समाजकंटकांकडुन केली जात असल्याचे थेरगाव सोशल फाऊंडेशन निदर्शनास आले आहे ही बाब अतिशय गंभीरस्वरूपाची आहे, त्यासाठी आम्ही गेल्या २ महीण्यापासुव पिं चिं महानगरपालिकेला याबाबत पाठपुरावा करीत आहोत, यामुळे पाण्यामध्ये जर काही विध्वंसक घटक समावेश झाला तर संपूर्ण शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते हि अतिसंवेदनशील बाब असल्याने आपण त्वरित या नदीपात्राच्या दोन्ही बाजून CCTV कॅमेरे बसवून हा परिसर आपल्या निगरानीत ठेवावा जेणेकरून त्याठिकाणावरून पाण्यामध्ये काही अनुचित व विध्वंसक घटक मिसळण्याचे काम कोणाकडून होता काम नये, पण अजुन ही महापालिके कडुन यावर कोणतीच दखल घेण्यात येत नाहीये त्यामुळे आज आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पर्यावरण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंची भेट घेऊन सर्वाना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल सरवदे अनिकेत प्रभु, प्रकाश गायकवाड, गणेश डांगे उपस्थित होते…