नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर शिंदे फडणवीस सरकारने ठराव न मांडल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सोमवारी विधानसभेतून सभात्याग केला. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे निलंबन मागे न घेतल्याचा निषेधही त्यांनी केला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यावर ठराव करण्याची मागणी केली. कर्नाटक विधानसभेने सीमावाद निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राला जबाबदार धरून संमत केलेल्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर त्यांची मागणी होती. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असा दावाही या ठरावात करण्यात आला आहे.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असल्याने विरोधकांनी उपस्थित केलेल्या दोन्ही मुद्द्यांवर कोणताही निर्णय सभागृहात घेता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांच्या घोषणेवर नाराजी व्यक्त करत एमव्हीएने कामकाजावर बहिष्कार टाकत विधानसभेतून सभात्याग केला.