देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती, जाणून घ्या ‘या’ योजनेचे फायदे?
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session) आज पाचवा दिवस आहे. (27 फेब्रुवारी) सोमवारपासून सुरु झाले आहे. अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी पाहयला मिळाल आहे, विरोधक कांद्या (onion) प्रश्नी, शेतकऱ्यांची वीज तोडणी, घरगुती गॅस दरवाढ तसेच महागाईच्या विरोधात विधान भवनाच्या पाऱ्यावर आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे आज अंगणावाडी सेविका पगारवाढवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सभागृहात पाहयला मिळाली. दरम्यान, अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर समोर आली आहे. त्यानंतर आता जुन्या पेन्शन योजनेबाबात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
दरम्यान, आता देशातील काही राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झाल्यानंतर आता जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने ओपीएस योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास त्याचा राज्य कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
देशातील ‘या’ राज्यात जुनी पेन्शन योजना लागू…
हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेश राज्यात ही योजना लागू झाली आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ओपीएस योजना पुन्हा बहाल करू असा वादा काँग्रेसनं केला होता, या योजनेचा फायदा येथील राज्य कर्मचाऱ्यांना होत आहे.
काय आहेत फायदे…
आता महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर राज्य कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पेन्शन ही ९१ हजारांपर्यंत मिळू शकणार आहे. मात्र नवी पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही ७ ते ९ हजारांपर्यंतच पेन्शन देण्याचे प्रावधान आहे. तसेच जुनी पेन्शन कर्मचाऱ्याला जर लागू झाली तर त्याला स्वःताच्या पगारातून रक्कम द्यावी लागणार नाही. दरम्यान नवी पेन्शनमध्ये दर महिन्याच्या पगारातून १० टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यावर १४ टक्के रक्कम सरकार देतं. जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल झाली तर कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्मे रक्कम पेन्शन म्हणून देऊ केली जाणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा इतर कायदेशीर वारसाला त्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 30 टक्के रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीला किंवा इतर वारसाला त्याच्या मरेपर्यंत उपलब्ध होणार आहे. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ३० हजार असेल तर जुनी पेन्शन योजनेता १५ हजार पेन्शन मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला या ठिकाणी 9 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच जुनी पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी देण्यात आली आहे.