पिंपरी :- केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची SPG सुरक्षा व्यवस्था काढून घेतली यांचा निषेध करत पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे निर्दशने करत निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे व सामाजिक चळवळीतील कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे उपस्थित होते.
या प्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यू आय चे शहराध्यक्ष डाॅ.वसीम ईनामदार, ज्येष्ठ नेते अशोक काळभोर, उमेश बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, निखिल भोईर, युवुस बागवान, अक्षय उपरे, गौरव हर्णे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गौरव चौधरी, दिपक भंडारी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव, अतुल अडसुळे, फारूख खान, सुभाष वाघमारे, लक्ष्मण म्हेत्रे, विशाल कोळी, सैज्जाद शेख, रहीम चौधरी आदि पदाधिकारी व ईतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांना दिलेली सुरक्षा या केंद्रातील मोदी सरकारने राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन काढून घेतली. वास्तविक पाहता या परिवारातील माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी, माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी आतंकवादयाशी लढा देताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या परिवाराने आपली हयात या देशाकरता घालवली याच परिवारातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर या परिवाराला असलेला जीवाचा धोका ओळखून, त्यांचा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी परिवाराला SPG सुरक्षा व्यवस्था दिली होती. तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी सुद्धा गांधी परिवाराची SPG सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची चूक केली होती त्यामुळेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या दहशतवाद्यांकडून करण्यात आली. अशाच प्रकारचा जीवाचा धोका कायम गांधी परिवाराला असताना सुद्धा या परिवाराची SPG सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. केंद्रातील मोदी सरकार राजकीय हेतूने प्रेरित होऊन विरोधकांना संपविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे या निर्णयामुळे दिसत आहे. अशा प्रकारच्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो केंद्र सरकारने लवकरात लवकर त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे अन्यथा युवक काँग्रेस वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे” असा इशारा यावेळी साठे यांनी दिला.