Chaupher News
पिंपरी : महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यातील योगदान याची दाखल घेऊन मानीनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण यांना नवी दिल्लीतील विश्वकर्मा विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे.
भारती चव्हाण यांनी राजकीय आणि सामाजिक व्यासपीठावरून गेल्या 28 वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम संघटन उभारले आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या प्रयत्नशील असतात. तसेच तळागळातील महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, कौटुंबिक अत्याचार या विषयांवर अनेक वर्षांपासून व सातत्याने काम करतात.त्याचबरोबर कामगार क्षेत्रातील त्यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन त्यांना गुणवंत कामगार परिषदचे अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि केंद्रीय कामगार कल्याण मंडळ नवी दिल्ली या संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली आहे.