Chaupher News
पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची अवस्था नाल्या सारखी झाली आहे. महापालिकेचे नागरीवस्तीतील मैला मिश्रीत पाणी थेट नदीत जात असल्याने पात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. नदीपात्र स्वच्छ रहावे, मैलामिश्रीत सांडपाणी नदीपात्रात जावू नये. यासाठी शहरातील पर्यावरण प्रेमी सातत्याने ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून देतात. तरी, देखील महापालिकेचे ढिम्म प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नदीने प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पवना प्रदुषित करणा-या पिंपरी महापालिका प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची अवस्था नाल्यासारखी झाली आहे. नदीपात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. संपुर्ण नदीपात्रात खराब पाण्यामुळे जलपर्णी निर्माण झाली आहे. पवना नदीची आवस्था पाहता नदीने प्रदुषणाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. महापालिका हद्दीतील रावेत बंधारा ते दापोडी पवनानदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपार्णी निर्माण आली आहे.
दुर्गधी, डासांचा त्रास नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीपात्र स्वच्छ रहावे, मैला मिश्रीत सांडपाणी नदीपात्रात जावू नये यसाठी शहरातील पर्यावरण प्रेमी सातत्याने ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून देतात. तरी, देखील महापालिकेचे प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. नदीपात्रा लगत टाकलेल्या ड्रेनेज लाईनच्या चेंबर मधून थेट मैलामिश्रीत पाणी नदीपात्रात जाते. तसेच महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारे मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी नदीपात्रात जाते. मैलाशुद्ध करण्याची प्रक्रिया पुर्ण क्षमतेने होत नाही हे त्याचे मुख्य कारण आहे.
विकासाचा दिंडोरा पिटणाऱ्या महापालिकेचे पवनानदीकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. नदी पात्राची झालेली दुरावस्था, होत असलेली दुर्गंधी याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी बारणे यांनी निवेदनातून केली आहे.