चौफेर न्यूज – कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रावर पण दिसून आला. परीक्षेच्या काळात कोरोनाने राज्यात प्रवेश केला तेव्हापासून अंतिम पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून केंद्र विरुद्ध राज्य आसा वाद चालू आहे. आता यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्याविरोधात रिट याचिका दाखल केली आहे.
“देशात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या ही १० लाखांच्या वर गेली असून कोरोना संक्रमणाच्या जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक आरोग्य याची कोणतीही चिंता आणि विचार केला नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मंत्री आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून सप्टेंबर महिन्यापर्यंत घेण्याचं जाहीर केलं आहे. यूजीसीनं जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वं अंमलबजावणीसाठी व्यावहारिक नाही.
काही दिवसांपूर्वी यूजीसीनं अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्याचा सूचना सर्व राज्यांना केल्या. परंतु परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम होतं. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्याही परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केलं जाणार असे राज्य सरकार म्हण आहे.