चौफेर न्यूज – भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT ) प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले आणि जेईई अडव्हान्समध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत.
‘आयआयटी’ तील प्रवेशासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते. आतापर्यंत जेईई अडव्हान्समध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रतेसाठी बारावीला 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण किंवा जेईई मध्ये पहिल्या 20 पर्सेटाईलमध्ये स्थान असे निकष होते. यंदा पुरते ते निकष शिथिल करण्यात आले आहेत.
कोरोनच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE ), अनेक राज्यांची परीक्षा मंडळे, ICSE यांना बारावीच्या काही विषयांची परीक्षा रद्द करावी लागली. यामुळे मंडळांनी सरासरीनुसार गुण दिले आहेत. मात्र त्यामुळे ‘आयआयटी’ तील प्रवेशासाठी बारावीतील गुणांच्या निकषाबाबत प्रश्न निर्माण झाला, या पार्श्वभूमीवर बारावीच्या गुणांचे निकष शिथिल करण्यात आले आहेत.बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि जेईई अडव्हान्समधून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार ‘आयआयटी’ त प्रवेश मिळू शकतो.