चौफेर न्यूज – शाळेला पूर्वकल्पना न देता जागामालकाने सुट्टीच्या दिवशी शाळेतील साहित्य बाहेर काढून शाळा पाडल्याची घटना वाई येथे घडली आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, शाळेत आलेल्या मुलींना आपली शाळाच पाडल्याचे दिसून आल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या शिक्षण संस्थेमार्फत वाई येथे महर्षी शिंदे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, गर्ल्स हायस्कूल या शाळा 1956 सालापासून चालविल्या जात आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने वाई ब्राह्म समाज यांच्याकडून वाई येथील रविवार पेठेतील ही जागा भाडेतत्त्वावर शाळेसाठी घेतलेली आहे. या संस्थेमार्फत सध्या त्या ठिकाणी गर्ल्स हायस्कूल चालविले जाते. ब्राम्ह समाज या संस्थेने वाई नगरपालिकेच्या पत्राचा व संस्थेला केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देऊन शाळा प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळेत कोणीही नसताना शाळेत प्रवेश केला. तेथे वर्गांची कुलपे तोडून शाळेतील संगणक, इलेक्ट्रिक वस्तू, महत्त्वाच्या कागदपत्रांसह शालेय साहित्य समोरील मोकळ्या जागेत काढून ठेवले.
गाड्यांमध्ये साहित्य भरत असताना परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी व माजी प्राचार्य राजकुमार बिरामने, शालेय समितीचे अशोकराव सरकाळे यांच्यासह शिक्षकांनी शाळेत धाव घेतली. यावेळी ब्राम्ह समाजच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे, त्यांचे पती डॉ. राजेंद्र साबळे हे त्यांच्यासोबत असलेल्या 7 ते 8 लोकांच्या साहाय्याने हे सामान ट्रॅक्टरमध्ये भरत होते. मुख्याध्यापिका ठोंबरे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. दरम्यान, सोमवारी सकाळी शाळा प्रशासनाने संबंधितांविरोधात तक्रार दिली आहे. सोमवारी राहिलेली इमारत पाडत असताना पोलिसांनी तंबी देऊन त्यांना थांबविले.
त्यांच्यासोबत असलेल्या 7 ते 8 लोकांच्या साहाय्याने हे सामान टॅक्टरमध्ये भरत होते. मुख्याध्यापिका ठोंबरे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. दरम्यान, सोमवारी सकाळी शाळा प्रशासनाने संबंधितांविरोधात तक्रार दिली आहे. सोमवारी राहिलेली इमारत पाडत असताना पोलिसांनी तंबी देऊन त्यांना थांबविले.
शाळा दुरुस्ती करण्याबाबत ठराव झाला होता. ब्राम्ह समाजाच्या वतीने आम्हाला कोणती कल्पना न देता घुसखोरी करून शाळा उचकटण्यात आली. शालेय साहित्याची नासधूस करण्यात आली असून, त्यांच्याविषयी आम्ही तक्रार केली आहे.