चौफेर न्यूज – तब्बल अकरा महिन्यानंतर महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. तरीही विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालये सुरु होण्याची आतुरता लागली होती. महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
तब्बल अकरा महिन्यानंतर महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. तरीही विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालये सुरु होण्याची आतुरता लागली होती. महाविद्यालये सुरु झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
यावर्षी कोरोना संसर्गामुळे वेळापत्रकानुसार महाविद्यालये, शाळा, विद्यापीठे सुरु होऊ शकली नाहीत. शालेय शिक्षण विभागाने टप्प्या टप्प्याने शाळा, कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी राज्यपालांसह झालेल्या बैठकीत महाविद्यालये सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर १५ जानेवारीला महाविद्यालये सुरु करण्याच निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी ६० तंटे ७० टक्के उपस्थिती दर्शवली. कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून वर्ग चालू करण्यात आले. अकरा महिन्यानंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रत्यक्ष दिसत होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ‘नमस्ते स्टुडंट-चलो कॉलेज अगेन’ हा नवखा उपक्रम यावेळी राबवण्यात आला.