चौफेर न्यूज – राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त केलीय. कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजले. पुढे संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय, असल्याचं म्हंटल जात आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत. जर का महाराष्ट्रातील जनतेने कोरोनाचे सर्व नियम पाळले नाहीत. तर आगामी काळात निश्चितच नाईलाजाने लॉकडाऊन जाहीर करावा लागेल.
याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च 2021 पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. तर ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे तिथे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्यासंबंधी स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्यामंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात येत असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.