चौफेर न्यूज – शहरी भागात कोरोनामुळे शाळा बंद आहेत, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही केवळ ५० टक्के गुणांचीच घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलीय. राज्यातील विविध विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ही मागणी केलीय.
विद्यार्थ्यांच्या सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षावर कोरोनाचा प्रभाव असून शिक्षणप्रक्रियेत अनेक अडथळे कोरोनामुळे निर्माण झाले आहेत. वर्षानुवर्षं सुरू असणाऱ्या शिक्षण पद्धतीत त्यामुळे अचानक फरक पडला असून यंदा विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक या सर्वांनाच नव्या आव्हानाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत वेगळे धोरण अंगिकारण्यात यावे, अशी मागणी पालक आणि शिक्षक संघटनांच्या वतीनं शिक्षणमंत्र्यांना करण्यात आलीय.
शहरी भागात कोरोनामुळे शाळा बंद आहेत, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही केवळ ५० टक्के गुणांचीच घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलीय. राज्यातील विविध विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे ही मागणी केलीय.
पूर्ण वर्षभर शाळाच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग करता आलेले नाहीत. त्यामुळे परीक्षेत प्रत्यक्ष प्रयोग कसे करून दाखवणार, हा प्रश्नही उपस्थित होोतय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी प्रयोग करून त्याचे जनरल नमुने सादर करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही शिक्षणंमंत्र्यांकडे करण्यात आलीय.