चौफेर न्यूज – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत. बारावीची परीक्षा आता मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.