चौफेर न्यूज – कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये सीबीएसई इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेबाबत अनिश्चितता कायम आहे. सूत्रांनुसार, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे 1 जून रोजी इयत्ता 12 च्या बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा करू शकतात.
यामध्ये परीक्षेचा कालावधी दिड तासावरून कमी करून अर्धातास केला जाऊ शकतो. माहितीनुसार, विद्यार्थ्यांसाठी 30 मिनिटांच्या कालावधीसाठी आयोजित होणार्या परीक्षेत त्यांना ऑब्जेक्टिव्ह म्हणज वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील.
रविवारी झालेल्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर, शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना 25 मेपर्यंत केंद्राच्या प्रस्तावावर लेखी प्रतिक्रिया मागवली होती. बैठकीच्या दिवशीच 32 राज्य अणि केंद्रशासित प्रदेशांनी सीबीएसईच्या 12वी बोर्ड परीक्षा आयोजित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते.
केवळ चार राज्य दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि अंदमान आणि निकोबारने परीक्ष न घेण्याचा सल्ला दिला होता. या राज्यांनी परीक्षेच्या अगोदर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या व्हॅक्सीनेशनची मागणी केली होती. याशिवाय बहुतांश राज्यांनी छोटे-छोटे फॉर्मेट म्हणजे दिड तासाच्या (90 मिनट) परीक्षेवर सहमी व्यक्त केली होती.