चौफेर न्यूज – कोरोना संकटामुळे शिक्षण क्षेत्राच्या कारभारावर परिणाम झाला आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल मूल्यमापन पद्धतीने तयार करुन १५ जुलै किंवा त्याच्या आसपासच्या तारखेला जाहीर केले जातील. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने निकाल बघून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतील.
मुलांना दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने १५ जुलै किंवा त्याच्या आसपासच्या तारखेला बघता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. पुढील शैक्षणिक वर्षाला जास्त विलंब होऊ नये म्हणून निकाल १५ जुलै किंवा त्याच्या आसपासच्या तारखेला जाहीर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले.
कोरोना संकटामुळे २०२१ या शैक्षणिक पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करण्याचा निर्णय झाला. तर इतर वर्गांतील मुलांना थेट पुढील वर्गाला प्रवेश देण्याचा निर्णय झाला. हे निर्णय झाल्यापासून दहावी आणि बारावीच्या वर्षाला असलेले विद्यार्थी आपापले निकाल कधी जाहीर होणार याची बघत आहेत. या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने १५ जुलै किंवा त्याच्या आसपासच्या तारखेला बघता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.