चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 14 नोव्हेंबर बाल दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅम ,सौ. वैशाली लाडे मॅम ,व्यवस्थापक श्री . वैभव सोनवणे सर, श्री. तुषार देवरे सर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता ,पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रतिमा व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सौ. सपना देवरे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका मनीषा मॅडम यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देताना सांगितले की नेहरूजींचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९मध्ये इलाहाबाद मध्ये झाला. ते हृदयाने निर्मल होते .त्यांनी आराम हराम आहे हे सूत्र सर्वांना दिले. नेहरूजींची देशभक्ती बेजोड होती. त्यांनी गांधीजींबरोबर देशाच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये सहभाग घेतला .आणि देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वेळा तुरुंगात गेले .1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू झाले .17 वर्षा पर्यंत देशाचे कुशल नेतृत्व त्यांनी केले. त्यांनी देशाला शांती आणि सहयोग सहयोग करा हा संदेश दिला. म्हणूनच नेहरू जिना शांतीदूत म्हणून ओळखले जाते. भारताचे संशोधन, विश्व इतिहासाची झलक, वडिलांचे पत्र कन्येसाठी इत्यादी प्रसिद्ध पुस्तके त्यांनी लिहिली नेहरूजींना मुले खूप आवडत असत. मुले त्यांना प्रेमाने नेहरू चाचा असे म्हणत असत. नेहरू जेव्हा विदेश यात्रेला जात असत तेव्हा मुलांसाठी काही ना काही काही ना काही वस्तू घेऊन येत असत नेहरूजींचा जन्मदिवस हा बालदिन दिवस म्हणून साजरा करतात. गुलाबाचे फुल त्यांना अतिशय प्रिय होते .नेहरूजींनी आपल्या कार्याने भारताचा गौरव वाढवला .त्यांच्या कार्यक्षेत्रात भारताची प्रगती झाली व विश्वामध्ये भारताचे महत्त्व वाढले असे सांगितले. याप्रसंगी इयत्ता आठवी विद्यार्थी सुबोध पिसोळकर याने वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात मिमिक्री करून दाखवली. तसेच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी श्री .इसुब जादूगर यांनी जादूचे विविध प्रयोग करून दाखवले .तसेच बाल दिनानिमित्त नर्सरी ते पहिली च्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कक्षाचे उदघाटन करण्यात आले. बाल दिवसानिमित्त नर्सरी ते पहिली ते पहिलीच्या विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. तसेच दुसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वेगवेगळे फन गेम घेण्यात आले .या सर्व स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन श्री गणेश नांद्रे सरांनी केले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.