पुणे: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी टी-20 मॅच आज पुण्यात होणार आहे. भारतीय संघातील स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. संजूच्या गुढघ्याला दुखापत झाली असून तो भारतीय संघासोबत पुण्यात गेला नाही.
भारतीय संघाने विजयी सलामी देत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता पुण्यातील सामना हा श्रीलंका टीमसाठी निर्णायक मानला जातो. यातील पराभवाने श्रीलंका संघावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढवणार आहे. सध्या भारतीय संघ कामगिरीमुळे फॉर्मात आहे. यामुळे भारतीय संघाचे या सामन्यातील विजयाचे पारडे जड मानले जात आहे. शिवम, दीपक हुडा, कर्णधार हार्दिक व उमरान मलिक हे फॉर्मात आहेत. त्यांची सलामीच्या सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली.
भारताचा टी-20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
श्रीलंकेचा टी-20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, राजकुमार राजकुमार, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.