भारताने रचला इतिहास, BCCI ने जाहीर केले बक्षीस
दक्षिण आफ्रिकेच्या सेन्वेस पार्क पॉचेफस्ट्रूम येथे खेळल्या गेलेल्या ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा (IND W U-19 vs ENG W U-19) पराभव करून इतिहास रचला. भारताच्या मुलींनी इंग्लंडवर 7 विकेट्सने मात करून तिरंगा फडकवला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ICC महिला U-19 T20 विश्वचषक टीम इंडियाचे अभिनंदन केले.
Congratulations to the Indian Team for a special win at the @ICC #U19T20WorldCup. They have played excellent cricket and their success will inspire several upcoming cricketers. Best wishes to the team for their future endeavours. https://t.co/BBn5M9abHp
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी संघासाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला बोर्डाकडून ५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
Women’s Cricket in India is on the upswing and the World Cup triumph has taken the stature of women’s cricket several notches higher. I am delighted to announce INR 5 crore for the entire team and support staff as prize money. This is surely a path-breaking year.
— Jay Shah (@JayShah) January 29, 2023
जय शाहने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले, “भारतातील महिला क्रिकेट वाढत आहे आणि या विजेतेपदाने त्याचा दर्जा आणखी उंचावला आहे. संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे.”
त्याने आणखी एक ट्विट केले आणि म्हटले की, “मी शेफाली वर्मा आणि टीमला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या T20 सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमंत्रित करतो. या महान कामगिरीचा उत्सव नक्कीच व्हायला हवा.”
जय शाहने अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचे कौतुक केले आणि सांगितले की आमच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी देशाचा गौरव केला आहे.
ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक 2023 च्या रविवारी 29 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाचे षटकार खेचले. भारतीय गोलंदाजांच्या जीवघेण्या आणि तगड्या गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ 68 धावांवर गारद झाला. इंग्लंडसमोर 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 3 गडी गमावून 69 धावा केल्या आणि तिरंगा फडकवला.