नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. भारतातील एक मोठा वर्ग मध्यमवर्गीय आहे. यात 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
7 लाख तक सालाना कमाने वालो को कोई कर नहीं देना होगाः वित्त मंत्री निर्मला सीतारमण#Budget pic.twitter.com/5TYsl1IVw9
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2023
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताचा हा अर्थसंकल्प अशा वेळी सादर केला जात आहे, जेव्हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत. संभाव्य मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा मोदी सरकारच्या बजेटकडे लागल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वार्षिक 7 लाखांपर्यंत कमाई करणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. आयकर स्लॅबची संख्या सहा वरून पाच करण्यात आली. 3 ते 6 लाख रुपयांवर 5 टक्के आणि 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 लाख ते 12 लाख रुपयांवर 15 टक्के आणि 12 लाख ते 15 लाख रुपयांवर 20 टक्के आणि त्याहून अधिक उत्पन्नावर 30 टक्के होणार आहेत