चौफेर न्यूज – राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार काही महत्त्वाचे पाऊलं उचणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणं हे आर्थिक दृष्टीकोनाने राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे सरकार पर्यायी मार्ग काढण्यावर भर देत असल्यांचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. मात्र, सध्या या परीक्षांवर कोरोनाचं सावट आहे. या परीक्षांवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी काल 9 वी ते 11 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लेखी परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे 2020-21 या वार्षिक वर्षातील विद्यार्थ्यांची कोणतीही लेखी परीक्षा न घेता त्यांना पास घोषित करण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातीही तसे पावलं उचलली जाण्याची शक्यात असू शकते. कारण विजय वडेट्टीवार यांनी त्याचप्रकारचे संकेत दिले आहेत.