काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, जय जय हरी विठ्ठल .
महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते. अशा संतांच्या हृदयात स्थान असणारे , अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा . मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. वर्षातील एकूण 24 एकादशी पैकी आषाढी एकादशीला अन्य साधारण महत्त्व आहे . कारण याच एकादशीला लाखो भावी , वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात. जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी . आठशे वर्षापासून वारीची ही परंपरा पाळली जाते. याच योगाने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल तर्फे कावठे या गावी आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विठ्ठल व रुक्मिणीचे रूप धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले . तसेच याप्रसंगी विठ्ठलाच्या पालखीचे पूजन शाळेच्या प्राचार्या सौ भारती पंजाबी मॅम प्राचार्य सौ. वैशाली लाडे मॅम व व्यवस्थापक श्री .वैभव सोनवणे सर श्री तुषार देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी इयत्ता सातवी, आठवी , नववी वर्गातील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या नृत्याचे प्रदर्शन केले. तसेच वारकरी बनवून आलेल्या विद्यार्थ्यांनी टाळांच्या गजरात राम कृष्ण हरी गोपाल कृष्ण हरी असे भजन केले व कावठे येथील भजनी मंडळाने अभंग व कीर्तनाची साथ दिली . टाळ व मृदुंगाच्या स्वरात कावठे गाव हरीमय होऊन गेले. तेथील विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात विद्यार्थ्यांनी फुगडी खेळली. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी झाडे लावा झाडे जगवा ,सेव ट्री सेव अर्थ, वृक्ष लावा घरोघरी पर्यावरण राखा जीवनी, पर्यावरणाचे करा रक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण, पेड पौधे मत करो नष्ट सास लेने में होगा कष्ट, पर्यावरण का रखे ध्यान बनेगा देश महान असे नारे दिले कावठे गावातील सर्व स्त्रियांनी पालखीतील विठ्ठलाचे पूजन केले .ज्ञानेश्वरी माऊली, निवृत्तीनाथ ,रामदास, एकनाथ, मुक्ताबाई या संतांची नावे घेऊन कावठे परिसर दुमदुमला . यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत भोजनाचा आस्वाद घेतला .या कार्यक्रमासाठी कावठे गावातील ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वाहन चालक मंडळाने सहकार्य केले.