संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल यांची माहिती
अकोला : नवोदित युवा साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अकोला येथे दि. 15 जानेवारी रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेच्या वतीने आयोजित या पहिल्या युवा साहित्य संमेलनात राज्यातील युवा साहित्यिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल यांनी दिली. शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संमेलनाविषयी माहिती दिली.
रामदास पेठ येथील अकोला विधी महाविद्यालयाच्या टिळक सभागृहात हे एक दिवसीय साहित्य संमेलन रंगणार आहे. युवा साहित्यिक दुर्गेश सोनार संमेलनाचे अध्यक्ष आहेत. सकाळी वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाचे बिगुल वाजेल. उद्घाटन सत्रात मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 10 युवक युवतींना ‘युवा आयकॉन’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दुपारी वाजता कवी संमेलन, दुपारी साडेतीन वाजता युवा साहित्य समस्या या विषयावर परिसंवाद होणार असून, सायंकाळी 5.15 वाजता समारोप सत्र होणार आहे. तर सायंकाळी वाजता गझल मुशायरा कार्यक्रम होऊन संमेलनाचा समारोप होईल.
संमेलन स्थळी पुस्तकांचे स्टॉल असणार आहेत. तसेच काही प्रकाशकांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या संमेलनासाठी विविध समितींचे गठन करण्यात आले असून, पदाधिकारी, युवा साहित्यिक परिश्रम घेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रविण हटकर, सचिव संतोष इंगळे, गिरीश मोखडकर, शिवाजी भोसले, अभिजीत नागले, जया वांडे पाटील, धम्मानंद इंगळे, अमित ठाकरे, गजानन छबिले, ऋतुराज अवताडे, धिरज चावरे, मिलींद हिवराळे, अभिजीत नागळे, पुजा काळे, जया पाटील, कल्याणी मंडलीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी सकाळी नऊ वाजता धनंजय देशमुख आणि त्यांचे सहकारी स्वागतगीत सादर करणार आहेत. अकोल्याचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत, सचिन काटे, उमेश म्हैसने, दिनेश भालतिलक, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संदीप चव्हाण, साहित्यिका शैलजा वाघ दांदळे आदी या वेळी उपिस्थित राहणार आहेत. प्रविण हटकर प्रास्ताविक करणार आहेत. पूजा काळे आणि गोपाल मापारी सूत्रसंचालन करणार आहेत. प्रानिधिक काव्यसंग्रह ‘झळ’ आणि पंकज काळे यांच्या ‘उडाण’ काव्यसंग्रहाचे या वेळी प्रकाशन करण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता सत्कार समारंभ होणार आहे. किशोर बळी, निर्भय पोहरे, नासरी चव्हाण, देवानंद मोहोह, विजय रांदड, युवराज कदम, अमोल मानकर, अमोल मुंडगावकर, अमोल टाले यांचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे. पूजा काळे या वेळी सूत्रसंचालन करणार आहेत. संतोष इंगळे आभार मानणार आहेत.
दुपारी 12 वाजता परिसंवाद होणार आहे. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक संदीप भारंबे अध्यक्षस्थानी राहतील. लोमतचे वरिष्ठ उपसंपादक डॉ. किरण वाघमारे या वेळी उपस्थित राहणार आहेत. हिंगणघाट येथील मनीषा रिठे, अकोला येथील गिरीश मोखडकर, शिवाजी भोसले, औरंगाबाद येथील राजू चिमणकर, देवानंद पवार या परिसंवादात सहभाग घेणार आहेत. प्रीती राहुल पाटील सूत्रसंचालन करणार आहेत. दीपिका सोनार आभार मानणार आहेत.
दुपारी 2 वाजता कविसंमेलन होणार आहे. लोणार येथील डॉ. विशाल इंगोले अध्यक्षस्थानी राहतील. गडचिरोली येथील शिवकवी ईश्वर मते आणि गोवा येथील रमेश घाडी या वेळी उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा येथील रमेश आराख सूत्रसंचालन करणार आहेत. धुळे येथील मिलिंद हिवराळे आभार मानणार आहेत. औरंगाबाद येथील प्रियंका ठोंबरे, विकास देशमुख, परतवाडा येथील वृषाली देवकर, अलका मालनकर, अकोला येथील कल्याणी मंडलिक, जया वांडे, नांदेड येथील विजया गायकवाड, संग्रामपूर येथील अरविंद उन्हाळे, चंद्रपूर येथील किशोर कवठे, अविनाश पाईनकर, रत्नाकर चटप, पुणे येथील सागर काकडे, अनंत राऊत, वाशिम येथील चाफेश्वर नांगवे, वैभव भिवरकर, डॉ. विजय काळे, विष्णू जोशी, नायगाव येथील संतोष भाकरे, अमरावती येथील पंकज कांबळे, शिवणी येथील शुभम सावळे आदी यात सहभागी होणार आहेत.
दुपारी साडेचार वाजता समारोप होणार आहे. नीलेश जळमकर, रुपेश देशमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत. हिरल गावंडे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रा. कल्याणी मांडलिक आभार मानणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता गझल मुशायरा होणार आहे. अमरावती येथील नितीन देशमुख अध्यक्षस्थानी राहतील. अकोला येथील अमित वाघ आणि अमोल शिरसाट या वेळी उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा येथील जयदीप विघ्ने, सुरेश इंगळे, नाशिक येथील आकाश कंकाळ, अकोला येथील मंगेश गजभिये, गडचिरोली येथील सुरेश शेंडे, गोवा येथील परेश नाईक, जळगाव जिल्ह्यातील शरद धनगर, साखरखेडा येथील योगेश देवकर, चंद्रपूर येथील रामकृष्ण रोगे, मुंबई येथील रत्नमाला शिंदे, चांदूर बाजार येथील ओमप्रकाश ढोरे, वर्धा येथील विद्यानंतद हाडके, बीड येथील सतीश दराडे, इंद्रजित उगले, धुळे येथील मिलिंद हिवराळे, यवतमाळ येथील आबेद शेख, पनवेल येथील राधिका फराटे आदी यात सहभाग घेणार आहेत. गोवा येथील दत्तप्रसाद जोग आणि दर्यापूर येथील संघमित्रा खंडारे सूत्रसंचालन करणार आहेत. सूरज मापारी आभार मानणार आहेत.