निजामपूर : येथील गोकूळदास गुजराथी सहकारी पतसंस्थेतर्फे माजी अध्यक्ष संजय गोकूळदास शाह त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त निजामपूर येथील अमरधामधे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे गुजराथी परिवार; तसेच सरपंच, सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या साक्षीने लोकार्पण करण्यात आले. ग्रामपंचायतीतर्फे गुजराथी परिवार; तसेच गुजराथी पतसंस्था त्यांच्या दातृत्वासह स्मरण या सामाजिक बांधिलकीच्या मातृहृदयी उपक्रमाचे आभार पत्र प्रदान करून कौतुक करण्यात आले.
निजामपूर शहरापासून पूर्वेकडे रोहिणी नदीच्या काठापासून काही अंतरावर अमरधाम असून, त्या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून ग्रांम पंचायतीने अंत्यसंस्कार शेड, ग्रामस्थांसाठी बसण्याचे सिमेंट मोठे शेड, आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक आदी कामे करण्यात आली; मात्र पाण्याची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार विधीसमयी ग्रामस्थांना गैरसोरीचे ठरत असे. अडचण लक्षात ठेवत गोकूळदास गुजराथी पतसंस्थेचे संस्थापक पंकज शाह, अध्रक्ष डॉ. हेमंत पाटील व संचालक मंडळाने पतसंस्थेचे माजी अध्यक्ष संजय शाह यांच्या स्मरणार्थ पतसंस्थेतर्फे अमरधामात पाण्याची टाकी बांधून दिली.
या टाकीचे लोकार्पण संजय शाह यांची कन्या, अध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, सरपंच अजितचंद्र शाह, उपसरपंच रजनीबाई राणे, जिल्हा परिषद सदस्या उषाबाई ठाकरे, पंचायत समितीचे सदस्य वासुदेव बदामे, पतसंस्था संस्थापक पंकज शाह, संचालक धर्मराज चिंचोले, नितीन शाह, त्रिलोक दवे, व्यवस्थापक गजाजन शाह, ग्राम पंचायत सदस्य सलीम पठाण, परेश पाटील, राजेंद्र पाटील, म्हसाई ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, रवींद्र राणे, प्रवीण वाणी, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य चंदूलाल जाधव, सीताराम वाणी, प्रमोदचंद्र शाह, जगदीश शाह, रुसुफ सैय्यद, शाम शाह, प्रवीण शाह, माजी सरपंच अरुण वाणी, अरुणभाई शाह, रवी कोठावदे, रमेश राणे, प्रा. बी. बी. जगदाळे, हर्षद गांधी, रघुवीर खारकर, विजय महाले, विजय राणे, विशाल मोहने, ग्राम पंचायतीच्या महिला सदस्या, पतसंस्था संचालक, कर्मचारी
उपस्थित होते.
ग्रामपंचायतीतर्फे पतसंस्थेला आभार पत्र
पतसंस्थेने पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन निजामपूरच्या अमरधाममधे पाण्याची टाकी बांधून ग्रांम पंचायतकडे लोकार्पण कार्यक्रमातून सुपूर्द केल्याने गुजराथी परिवाराचे कौतुक करीत सरपंच अजितचंद्र शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य वासुदेव बदामे, डॉ. हेमंत पाटील, रघुवीर खारकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच अजितचंद्र शाह यांनी आभार मानले.