धुळे : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा रोजना लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांना लागू असून, कर्ज घेणार्रा शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांना रोजना ऐच्छिक स्वरुपाची आहे, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी केले आहे.
योजनेची मुदत 31 डिसेंबरपर्रंत वाढविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागातील कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.