प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 75 प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
साक्री :- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, संयोजक सपना देवरे, शाळेतील विद्यार्थिनी करिष्मा पाटील, पालक देवेंद्र पाटील, गीतांजली पाटील यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तनिष्का अहिरराव या विद्यार्थिनीने भारत मातेची भूमिका साकारली. याप्रसंगी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीताचे सादरीकरण केले. यासाठी तेजस्विनी घरटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्रावण अहिरे यांनी संविधान विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून वदवून घेतली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन केले. यासाठी कुणाल देवरे, प्रफुल्ल सर, तुषार सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. “कंधे से कंधे मिलते ” या देशभक्तीपर गीतावर नृत्याचे सादरीकरण युकेजीच्या विद्यार्थ्यांनी केले. यासाठी मार्गदर्शन हिरेल सोनवणे यांनी केले. याप्रसंगी कार्तिक नेरकर (पहिली ), विधी देसले (तिसरी), आसीम पटवे (चौथी), निधी पंजाबी (तिसरी ), अनुष्का वाणी (आठवी ), मृणाल बेडसे (नववी ), हर्षवर्धन पाटील (नववी ) या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती दिली. २६ जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी गुलामगिरीतून मुक्त झाला. पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी कारण या दिवशी भारताचे राज्यघटना लागू झाली. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. शाळेच्या शिक्षिका नीतू पंजाबी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती देताना सांगितले की, भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व एकता या तत्त्वावर आधारित आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आपण वीर सलामी देऊया. कुमारी करिष्मा भीमराव पाटील हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती देताना सांगितले की, संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. तसेच आपल्या देशाची एकता अखंडता टिकून ठेवली पाहिजे .शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती देताना सांगितले की, हा दिवस आपल्या देशासाठी लढलेल्या देशभक्तांची, अतुल पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांची व त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. त्यांचा विचार करून आपण सर्वांनी देश हितकार काम केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व डेकोरेशन साळुंखे, दीपमाला मॅम यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन सविता लाडे, दीपमाला मॅम, अश्विनी मॅम, चौधरी मॅम, देवरे मॅम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीच्या विद्यार्थिनी नीलिमा पाटील व श्रेया कुवर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सपना देवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्ग उपस्थित होते.
Post Views: 39