धुळे : मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारतानाच धुळे-नाशिक देखील रेल्वेमार्गाने जोडण्याचा निश्चय केंद्रीय रस्ते, परिवहन आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे रांनी दिल्ली येथे गडकरी यांची आभार व्यक्त करण्यासाठी भेट घेतली असता धुळे-नाशिक ही औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची ठरणारी शहरे जोडण्याविषयी आग्रही मागणी केली असता गडकरी यांनी थेट रेल्वेमार्ग निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचाच विचार बोलून दाखविला.
मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे सहा महिण्यात भूमीपूजन करण्याचे आश्वासन गडकरी यांनी धुळ्यात नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत दिले आहे. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी नवी दिल्ली येथे डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे आणि नाशिक ही शहरे देखील रेल्वे; तसेच रस्याने जोडण्यावर लक्ष वेधले. त्यावेळी गडकरी यांनी धुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी एक मोठी संधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग साकारतानाच धुळे-नाशिक यांनाही रेल्वेव्दारे जोडण्याचा मानस यांनी व्यक्त केला.
जेएनपीटी बंदराच्या विकासाबरोबरच येथून होणाऱ्या वाहतुकीला साहाय्यभूत ठरेल असे ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्यात तयार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निफाड तालुक्याच्या जवळपास हे ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर साकारले जाणार असून, तेथून होणाऱ्या वाहतुकीला साहाय्यभूत ठरेल, अशा पध्दतीचा रेल्वेमार्ग विकसित करण्याचा आणि त्याच अनुषंगाने धुळे-नाशिक ही दोन शहरे रेल्वेव्दारे जोडण्याची नवीन संकल्पना गडकरी यांनी मांडली आहे. त्यासाठी सर्व्हे करणार असल्याचाही मनोदर त्यांनी व्यक्त केला आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारण्यासाठी रेल्वे मंत्रालरासोबत जहाज बांधणी मंत्रालय संयुक्त करार करून निम्मा खर्च उचलणार आहे. राबाबतचे प्राथमिक टप्पे पूर्ण झाले असून, दोन्ही मंत्रालयांनी त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे.